HW News Marathi
महाराष्ट्र

देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा, पवारांचे भावनिक ट्विट

 

मुंबई | देशात दिल्ली सीमेसह अन्य ठिकाणी नव्या कृषी विषयक कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे आज (२३ डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावनिक ट्विट केले आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. ”अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतं आहे. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो.”, अशा आशयाचे पवार यांनी केले आहे. अद्यापही शेतकरी आंदोलन थांबविण्यात केंद्र सरकारला यश आले नसल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारने शेतकरी संघटनांना पाठविलेल्या पत्रावर संयुक्त किसान मोर्चा आज बुधवारी सकाळी बैठक घेत असून लेखी प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. दरम्यान, आज आंदोलनाच्या २७ व्या दिवशीही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते जाम केले आहेत. तसेच, माजी केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींची भेट देखील घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस पळाले,पण इरफान मुख्यमंत्र्यासाठी धावला ! लिहणा-या पत्रकारावर निलंग्यात गुन्हा दाखल 

News Desk

#Coronavirus : कोवीडसंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या ! 

News Desk

‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपालांकडून नुकतेच सन्मानित झालेले राजेंद्र सरग यांचे निधन

News Desk