HW News Marathi
महाराष्ट्र

एल्गार परिषद : शरजील उस्मानीचा पुण्यात पोलिसांनी नोंदवला जबाब

पुणे | पुण्यात जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने समाजात तेढ निर्माण करणारे विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी उस्मानीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आज(१८ मार्च) स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्यात त्याची जवळपास ३ तास जबाब नोंदविण्याचं काम सुरु होतं, अशी माहिती स्वारगेट पोलिसामार्फत देण्यात आली आहे. याचसंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत उस्मानीने वादग्रस्त विधान केलं होतं. या प्रकरणी भाजपचे नेते प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानुसार १५३ अ कलमाअंतर्गत उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उस्मानीवर कारवाई करण्यात यावी यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झाल्याचंही पहायला मिळालं. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना उस्मानीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली.

मागील आठवड्यात ८ मार्चला शरजील उस्मानी हा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून जबाब नोंदवून गेला होता. मात्र आणखी काही माहिती हवी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आज पुन्हा स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये शरजील उस्मानी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आला. पोलिसांनी जवळपास तीन तास त्याची चौकशी केली. त्यानंतर उस्मानी पोलीस स्थानकामधून बाहेर पडला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्या – प्रविण दरेकर 

News Desk

ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी करत लोकार्पण! – गोपीचंद पडळकर

Aprna

मुख्यमंत्री उद्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर, सांगलीचा दौरा करणार

News Desk