HW News Marathi
महाराष्ट्र

#Article370Abolished : आज देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले !

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील ३७० कलम अंशत: रद्द करण्यात आले आहे. या कलम ३७०मधील आता एकच खंड राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यभेत आज (५ ऑगस्ट) सांगितले आहे. “आज देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्या निर्णयाचे अभिनंदन केले आहे. उद्धव ठाकरे पुढे असे देखील म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींचे स्वप्न आज पूर्ण झालेले आहे, यासाठी नरेंद्र भाई-अमित भाई यांचे मी अभिनंदन करतो.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“देशात पोलादीपणा कायम आहे, हे मोदी सरकारने जगाला दाखवून दिल. आज देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे, मोदीने सरकारने देशाला जखडून ठेवणाऱ्या त्या बेड्या आज तोडून टाकल्या आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यानंतर मोदी सरकाराने कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करणार आहे. यानुसार जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळे करण्यात आले आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा अस्तित्वात राहणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंसह १८ कार्यकर्त्यांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk

औरंगाबादमध्ये ४८ तास इंटरनेट सेवा रहाणार बंद

News Desk

बेकायदा गर्भपात प्रकरणी रुग्णालयाचा परवाना रद्द

swarit