HW News Marathi
महाराष्ट्र

विशेष कायदा करा, अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा !

मुंबई । “विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा” ही शिवसेनेची मागणी असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा, या मागणी आणि भूमिकेवर शिवसेना आजही ठाम असल्याचे ठाकरेंनी दसरा मेळाव्यात सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “आमचा कारभार कसा असेल तर प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” “प्राण जाए पर वचन ना जाए ही शिवसेनेची निती आहे, ही शिवसेनेची वृत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.” विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शिवसेना वचनाला अद्याप जाहीर झाला नसा तरी त्या कोण्या घोषणा असलतील यांची कल्पना देखील ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीत; मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

News Desk

MPSC परिक्षेबाबत मुख्यमंत्री लवकरचं तोडगा काढणार,नाना पटोलेंच आश्वासन!

News Desk

विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही! – जयंत पाटील

Aprna