HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी आभार मानण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (२९ जून) भेट घेतली आहे. मराठा आरक्षण लढ्याला दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानण्यासाठी समन्वय आले. मराठा मोर्चाचे वकील, समन्वयक आणि याचिकाकर्ता आले. श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काही केले नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्यानी वाद जास्त रमवू नये, असे ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगिले.

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याला धरूनच आहे, पूर्णपणणे वैध आहे, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१८ जून) दिला. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल, असे न्यायालयाने नमूद केले. या निकालानंतर राज्यभर मराठा समाजाचा जल्लोष सुरू आहे.

ठाकरेंनी दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात लढाई झालीच तर शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी मराठा समाजासोबत असेल असे स्पष्ट केले. शिवाय सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्यांना “वादात रमण्यात अर्थ नाही” असे ठाकरेंनी म्हटले आहे.शिवाय मराठा समाजाची ही एकजूट तुटू देऊ नका, ही अशीच कायम ठेवा असे ठाकरेंनी यावेळी जमलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना आवाहन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी ‘या’ नावांची चर्चा

Manasi Devkar

दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार! – नितीन गडकरी

Aprna

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक; ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

Aprna