HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्र तुफां के साथ हमेशा खेला है”, चाकणकरांचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई | मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. यालाच पलटवार करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना सुनावले आहे.

काय आहे रूपाली चाकणकर यांचे ट्विट?

तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है, महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है!

 

अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात काय बदल होणार का? याची चर्चा सुरू झाली असताना राष्ट्रवादीने चांगलाच समाचार घेतला आहे.

काय होतं अमृता फडणवीस यांचं ट्विट?

‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार, असे काही प्रश्न अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे उपस्थित झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजाच काय अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, राऊतांचा दावा

News Desk

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरू नका | गृहविभाग

News Desk