HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीत शिवसेना- भाजप कार्यकर्ते आमनेसामने!

सांगली | सांगलीत झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(२ ऑगस्ट) गेले आहेत. पाहणी करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरुद्ध घोषणा देऊन आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे तिथे जमलेल्या शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.

‘जय भवानी, जय शिवाजी’

भाजप कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलन शिवसैनिकांनी देखील घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘आवाज कुणाचा, शिवसेने’चा अशा घोषणा देत शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दीतील लोक सैरावैरा धावू लागले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा या परिसरातून निघून गेला. तर पोलिसांनी तात्काळ धाव घेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री गेल्यानंतरही तब्बल १५ मिनिटं हा गोंधळ सुरूच होता. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून निदर्शने करत होते.

आंदोलनाचं कारण काय?

भाजप कार्यकर्ते अचानक आक्रमक का झाले? मुख्यमंत्रायणी निवेदन ऐकून घेतलं नाही म्हणून कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचं समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. त्यांनी आमची निवेदने घेतली नाहीत. त्याआधीच निघून गेले. हा पूरग्रस्तांचा अपमान आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री घरोघरी जावून पूरग्रस्तांचे अश्रू पुसायचे. मात्र, हे मुख्यमंत्री आमचा अपमान करून गेले, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढील कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.

भाजपचा निवेदन न देता स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न

शिवसेना आणि भाजप मध्ये सध्या वादावादी आहे. रोज दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतात. भाजपने आज(२ ऑगस्ट) केलेल्या आंदोलनावर देखील शिवसैनिकांनी टीका केली आहे. भाजपचा हा दावा मात्र शिवसैनिकांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्री सकाळपासून फिरत आहेत. लोकांच्या व्यथा वेदना जाणून घेत आहेत. सांगलीतील इतर गावातील लोकांनी शांतपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली. मात्र, भाजपने निवेदन न देता स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, असा दावा शिवसेनेने केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आठ महिने झाले,पाळणा कधी हलणार ? सेनेची राज्यपालांवर टिका!

News Desk

कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय सुरक्षा

News Desk

ठरलं! पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं होणार

News Desk