HW News Marathi
महाराष्ट्र

‘मन बात’ नको ‘काम की बात’ करा, जळगाव दौऱ्यात शिवसेनेनं फडणवीसांची गाडी अडवत केली टोलेबाजी

जळगाव | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (१ जून) मुक्ताईनगरमध्ये जाऊन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्ष बांधणीवर चर्चा केली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव भाजपला गळती लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड थांबणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच जळगावमध्ये आले होते. त्यांनी मुक्ताईनगरमध्ये थेट एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते गिरीश महाजनही उपस्थित होते. फडणवीस येणार म्हणून खडसे यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी फडणवीस यांनी खडसेंच्या घरात बसून जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या बांधणीवर रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच जळगावमध्ये खासकरून रावेर मतदारसंघात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीवरही त्यांनी चर्चा केली.

रुग्णालयाची पाहणी

फडणवीस जवळपास अर्धा तास खडसे यांच्या निवासस्थानी होते. त्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना झाला. या ठिकाणी त्यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. नंतर त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन केळी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला

ताफा अडवला

खडसे यांच्या घरातून निघून नुकसानीची पाहणी करत असताना काही शेतकऱ्यांनी फडणवीसांचा ताफा अडवला. यावेळी त्यांनी सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसून आम्हाला मदत करावी, असं आवाहन फडणवीसांना केलं. तसेच, देवेंद्र फडणवीसांचा मुक्ताईनगर मधील परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यात अडवला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या केळी पिक विमा बाबत विरोधी पक्ष नेत्यांना जाब विचारण्यात आला. तसेच, मन की बात नको काम की बात करा असा टोलाही यावेळी शिवसैनिकांनी भाजपला, फडणवीसांना लगावला आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांचा सेना, राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आल्यापासून जळगाव भाजपमध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे. अनेक नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. ग्रामपंचायतीचा निकालही भाजपच्या विरोधी गेला आहे. खडसे गेल्यानंतर पक्षाची होणारी पडझड थांबवण्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयत्नही अपुरे पडताना दिसत आहे. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड रोखण्यासाठी फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. फडणवीस यांनी या भेटीत पक्षाच्या बांधणीवरच रक्षा खडसे आणि महाजन यांच्याशी चर्चा केल्याने फडणवीसांनी जळगाव जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं बोललं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार ,शरद पवार,धनंयज मुंडे यांनी संजय राऊत  यांची घेतली खासमखास भेट !

News Desk

चंद्रकांत पाटील को गुस्सा क्यू आता है? हसन मुश्रीफ म्हणतात…

News Desk

कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाहीत, मंत्र्यांच्या गाड्यांसाठी मात्र लाखोंची उधळपट्टी

News Desk