HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि कोर्टातही टिकवलं मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही –  शिवेंद्रराजे भोसले  

सातारा | “कुणी मान्य करा अथवा नका करू. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय”, अशी टीका छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज (२८ जानेवारी) केली आहे. साताऱ्यात आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. या फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते. बऱ्याच दिवसानंतर हे दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लागलं होतं.

यावेळी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं. आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे कार्य हे मराठा समाज एकत्र आणण्यासाठी होणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नरेंद्र पाटील यांना आपण साथ दिली पाहिजे, असं शैलेंद्रराजे म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावं लागेल. फडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टातही टिकवलं होतं. नंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही, असं ते म्हणाले. एखाद्या पक्षाचा सदस्य म्हणून मी बोलत नाही. ही माझी भावना आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला खोडा घालण्याचं काम करत आहे. आरक्षणावरून टोलवाटोलवी सुरू आहे. खरं तर याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपल्यात एकी नाही, असंही ते म्हणाले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक! – पालकमंत्री छगन भुजबळ

News Desk

रिपब्लिक टीव्हीने पैसे देऊन TRP वाढवला, असत्यमेव जयते ! संजय राऊतांचे ट्विट

News Desk

“मी शरद पवारांच्या तालमीत तयार झाले हे सांगायला मला संकोच वाटत नाही – चित्रा वाघ

News Desk