HW News Marathi
महाराष्ट्र

फलटणमध्ये शॉक लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू

सातारा | पालखी तळावर तीन भाविकांना विजेचा धक्का बसला आहे. आणि या दुर्घटनेत दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानोबा माधवराव चोपडे (६५) वर्षे आणि जाईबाई महादू जामके (६०) वर्षे यांचा मृत्यू झाला असून कमलाबाई गोविंद लोखंडे (६५) वर्षे या जखमी झाल्या आहेत. सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास फलटण पालखी तळावर विद्युत वाहक तार गेली होती. या तिन्ही वारकऱ्यांना ही तार न दिसल्याने त्यांना या विद्युत तारेचा शॉक बसला.

तसेच तरडगाव ते फलटण मार्गावर माऊलींचा सोहळा येत असताना तीन भाविकांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर काही वेळात फलटण येथील पालखी तळावर तीन भाविकांना विद्युत वाहक तारेचा धक्का बसून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकरी महिला कविता तोष्णीवाल यांचा रस्ता ओलांडताना ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. तोष्णीवाल या वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी आल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते

News Desk

“राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदुंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं”, संजय राऊत भडकले

News Desk

“ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते, वेलकम खडसे साहेब” –  रोहित पवार

News Desk