HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

मुंबई | राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान भवनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य सरकारने २०१८-२०१९ या वर्षाचा १५ हजार ९३० कोटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे खालीप्रमाणे

ग्रामीण भागासाठी सांडपाण्याचे व्यवस्थापन, दुर्भिक्ष, सांडपाणी योजनेसाठी ३३५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शहरी भागात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवले जात आहे. राज्यातील सर्व शहरे हगणदारीमुक्त करण्यात आलेली आहेत.

घनकचरामुक्त शहरे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी २१० शहरात ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे सुरू आहे. ओल्या कचऱ्यापासून कंपोष्ट खताची निर्मिती करण्यात येत आहे. हे खत एक कंपनीला देण्यात येणार आहे. या खत्यासाठी पाच कोटीचे अनुदान देण्यात येणार आहे.

मूलभूत सुविधा देण्यासाठी ‘अमृत’ ही योजना सुरू केली आहे. ७७५० कोटींचा आराखाड मंजूर केला आहे. २०१८-१९ मध्ये दहा पाणी पुरवठा प्रकल्प सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे. यासाठी २३१० कोटी प्रस्तावित केले आहेत.

राज्यातील सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ड वर्ग पालिकेत ९८ कोटींचे प्रकल्प मंजूर केला आहे. यासाठी ९२० कोटींची तरतूद यंदा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टिस्पेशालिटी रुग्णलयासाठी २० कोटी रुपये दिले जाणार आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्र २१ कोटी १९ लाख प्रस्तावित आहेत. यंदाच्या वर्षात या तरतूदी मांडल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आला, वाझेंच्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालं, फडणवीस-पवारांच्या शपथविधीवरुन राऊतांचा टोमणा 

News Desk

शिवसेना १५ दिवसात लोकसभा, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार जाहीर करणार

News Desk
कृषी

अर्थसंकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंद

News Desk

मुंबईः राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी दोन वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सादर करणार आहेत. सुमारे साडेचार हजार कोटी रुपये तुटीचा हा अर्थसंकल्प असणार आहे. कृषी क्षेत्रात प्रचंड भरीव काम केल्याचा दावा सरकारच्यावतीने आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आला असला तरी कृषी विभागासाठी सर्वात कमी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे या क्षेत्राची अधोगती झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सिद्धिविनायक दर्शन घेण्यासाठी गेले होते. यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून असेल, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगाचा 55 हजार कोटींचा बोजा, राज्यावरील कर्जाचा वाढता डोंगर, महसुली खर्चात झालेली वाढ, उत्पन्न वाढवण्यावरील मर्यादा आणि लोकांच्या अपेक्षा यांची सांगड घालताना अर्थमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

Related posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 16 जुलैपासून दूध संकलन बंद

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी

swarit

माझं मत- तुमच्या शहरातील एटीएममध्ये पैसे आहेत का ?

News Desk