HW News Marathi
महाराष्ट्र

पाण्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू

बीड | बहिण पाण्यात बुडत असताना वाचवायला गेलेल्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील रामनगर शिवारातील पाझर तलाव येथे शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे. पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरज राजेश पवार (वय १५) व रंजना राजेश पवार (वय ८) रा. सात्रापोत्रा ता.बीड अशी मृत बहिण – भावाची नावे आहेत. रामनगर शिवारात या दोघांचे आई-वडील विहीरीवर कामास येत होते. त्यांच्याबरोबरच शनिवारी सुरज व रंजना आले असता नेहमीसारखे ते पोहण्यासाठी लगतच्या पाझर तलावाकडे गेले. सुरज याला पोहता येत होते तो बहीणीलाही पोहायला शिकवत होता. मात्र, तलावाच्या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने रंजना ही बूडू लागली . तिने वाचविण्यासाठी आरडाओरड करताच सुरज तिला वाचविण्यासाठी गेला असता तिने त्याला घट्ट मिटी मारली त्यामुळे या दोघांचाही यावेळी बुडून मृत्यू झाला.

राजेश पवार यांना सुरज आणि रंजना ही दोनच मुले होती. मात्र, शनिवारच्या या दुर्घटनेत त्यांनी दोघांनाही एकाच वेळी गमावल्याने त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. दोघांचेही मृतदेह एकाच वाहनातून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. हे दोघेही घटनास्थळीच मृत होऊन देखील आणखी एकदा तपासणी करण्याची विनवणी हे माता-पिता करीत होते. १५ वर्षाचा सुरज हा त्यांना विहीर खोदण्याच्या कामातही मदत करीत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते, SIT समितीच्या तपासात उघड

Aprna

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा केंद्रसरकारवर घणाघात!

News Desk

शरद पवारांच्या आजारावर टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसेनेने फटकारलं!

News Desk
Karnataka Election 2018 देश / विदेश

अखेर कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर पडदा, बी एस येडियुरप्पांचा राजीनामा

News Desk

बेंगळुरू | बी एस येडियुरप्पा यांनी अखेर शनिवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार शनिवारी विधानसभेत येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे गरजेचे होते. शनिवारी दुपारी ३.३० वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. दरम्यान येडियुरप्पा भाषणाला उभे राहिले परंतु बहुमत चाचणीला सामोरे न जाताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

यावेळी भाषण करताना येडियुरप्पा भावुक झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्राच्या निधीचा कर्नाटकात योग्य वापर झाला नाही. तसेच कर्नाटकात लोकसभेच्या 28 पैकी 28 जागा आम्ही जिंकू असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यानंतर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा अवघ्या काही तासांत राजीनामा दिला. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related posts

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरण : मुख्य आरोपी असीमानंदसह तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

News Desk

योगी आदित्यनाथ यांचा नेहमीच आदर करत आलो आहे !

News Desk

लाॅकडाऊन मोडल्याप्रकरणी मंत्र्यांच्या मुलाशी हुज्जत घालणाऱ्या गुजरातच्या सुनिता यादवची बदली…!

News Desk