HW News Marathi
महाराष्ट्र

रेल्वेतून चालते विषारी सापांची तस्करी

नागपूर | रेल्वेगाड्यांतून चक्क विषारी सापांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार विदर्भात उघडकीस आला आहे. दक्षिण एक्स्प्रेसमधून असा एक विषारी साप रेल्वे सुरक्षा दलाने पकडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या सापाच्या विषाची किंमत बाजारात २० लाखांवर असल्याचे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेच्या चमूने बुधवारी सायंकाळी ६ वाजता कळमेश्वर ते नागपूरदरम्यान रेल्वेगाडी क्रमांक १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एका पेटाºयात संशयास्पद वस्तू दिसली. या पेटाºयाबाबत विचारणा केली असता आरोपी सामन हुशयार गोसावी (२४) रा. शंकरगड, अलाहाबाद याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याजवळील पेटारा उघडून पाहिला असता त्यात दोन तोंडाचा साप (मांढळ) असल्याचे निदर्शनास आले. लगेच त्यास पकडून आरपीएफच्या गुन्हे शाखेत आणण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मॉलमध्ये हॉस्पिटल या आधी कधीच पाहिलं नाही,” भांडूपच्या आगीनंतर महापौरांचं वक्तव्य

News Desk

भुजबळ आधी म्हणाले ओबीसींचं नेतृत्व तुम्ही करा, आणि आता थेट फडणवीसांच्या भेटीला

News Desk

सनातन संस्थेवर बंदी घाला | अबू आझमी

swarit
देश / विदेश

अहमदाबादेत मुस्लिमांनी केली मंदिराची स्वच्छता

News Desk

अहमदाबाद गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर तिथे अनोखा बंधुभाव पाहायला मिळत आहे. बनासकांठातील धानेरामध्ये मुस्लिम बांधवांनी येथील मंदिरांमध्ये साचलेला चिखल स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानाचे फोटो वेगाने सोशल मीडियात व्हायरल होतआहेत.

धानेरामध्ये सिद्धिविनायक गणपती आणि सतीमाता मंदिर असून या मंदिरांमध्ये जवळपास ८ ते १० फूट पुराचे पाणी भरले होते. हे पाणी ओसरल्यानंतरमंदिरात चिखलाचा थरच लागला होता. १५ ते २० मुस्लिम बांधवांनी हा सगळा चिखल बाहेर काढून मंदिर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. जमिया उलेमा ए हिंदचे हेकार्यकर्ते पालमपूर येथून आले होते. पुराचा तडाखा बसलेल्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले होते. मी एकटाच सफाई करत असल्याचे पाहून त्यांनीमदतीचा हात पुढे केला. सुमारे दोन तास श्रमदान करून त्यांनी पूर्ण मंदिर स्वच्छ केलं. गणपती मंदिरानंतर त्यांनी जवळच असलेल्या सतीमाता मंदिरातही साफसफाईकेली असे, येथील पुजऱ्याने सांगितले.

Related posts

भाजपने पूर्णवेळ तंदुरुस्त नेता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमावा – काँग्रेस

Gauri Tilekar

भीषण स्फोटात इमारत जमीनदोस्त, सात ठार

News Desk

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ दोन खेळाडूंना कोरोनाची लागण…

News Desk