HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर तस तुम्ही राजश्रीला वहिनी साहेब म्हणू नका”, धनंजय मुंडेंची उपरोधिक टीका!

बीड। धनंजय मुंडे सपत्नीक कुटुंबियांच्या वतीने परळी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांसाठी येथील हालगे गार्डन येथे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की,राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत मजबूत स्थितीत आहे. राज्याचे पूर्वी मुख्यमंत्री व मंत्री राहिलेले अनुभवी या सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे विरोधकांचे सर्व डाव परतवून लावण्याची ताकत महाविकास आघाडी मध्ये आहे. विरोधकांना सर्व प्रकारे तोंड द्यायला आम्ही सक्षम आहोत, असे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

निवडणुकीसाठी विरोधकांना माणसेच नाहीत तर निवडणूक कशी लढणार

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी मंत्री काय झालो धनु चा भाऊ झालो आणि मंत्री झाल्यानंतर धनु भाऊ चा साहेब झालो?मी अजूनही भाऊच आहे. पण राजश्री वहिनी झाली आणि वहिनीची वहिनीसाहेब झाली, पण कृपाकरून माझ्या बहिणीला ताई साहेब म्हणून बोलतात पण माझ्या पत्नीला वहिनी साहेब म्हणून बोलू नका कारण मी, धनु भाऊच आहे, असा खोचक टोला विरोधकांना लगावला.परळी नगर पालिकेची निवडणूक लागली तर समोरच्यांना उमेदवार मिळतील की नाही, असा सवाल ही यावेळी बोलतांना उपस्थित केला, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विरोधकांना माणसेच नाहीत तर निवडणूक कशी लढणार अशी शंका त्यांनी बोलतांना उपस्थित केली.

वॉर्डात उमेदवार व बूथ वर माणसे देण्याची सुद्धा पंचाईत आहे

परळी नगर पालिका ही आपल्यासाठी केवळ एक सत्ता केंद्र नसून इथल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचे ते एक माध्यम आहे. मी माझी स्वतःची विधानसभेची निवडणूक जितकी गांभीर्याने लढलो, त्यापेक्षा नगर पालिकेची निवडणूक अधिक गांभीर्याने लढणार आहे. मात्र इथे महाविकास आघाडी म्हणून लढताना समोरच्या विरोधी पक्षाला प्रत्येक वॉर्डात उमेदवार व बूथ वर माणसे देण्याची सुद्धा पंचाईत आहे, असा खोचक टोला नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लागवला.

आमची माणस पूर्वी प्रत्यक्षात जाऊन मत मागायची

2004 ची लोकसभेची निवडणूकिवेळी प्रचाराचे प्रमुख स्वर्गीय प्रमोद महाजन होते. “आणि नेत्यांच्या प्रचार प्रमुख समितीमध्ये मी होतो, त्या वेळेस मोबाइल चा एस एम एस इंडियन शयनिग, सीमोल्ड ह्या गोष्टी यायच्या त्यावेळी मोबाईल वर प्रचार जास्त झाला….अन दणकून भारतीय जनता पार्टी देशात पडली ..आणि महाजन साहेबांची मुलाखात एका पत्रकाराने घेतली त्यावेळेस महाजन साहेबांनी चूक कबुल केली की, मला असे वाटतं की मी चूक केली की ही अत्याधुनिक साधन मी प्रचारात आणली ..आमची माणस पूर्वी प्रत्यक्षात जाऊन मत मागायची आणि यावेळी त्यांनी एस एम एस द्वारे मत मागू लागली त्यांच्यामुळे पूर्ण पणानं 2004 ची निवडणूक काठाला लागली. आपण जर व्हाट्सअप वर फेसबुकवर जर आपण मत मागायला लागलो तर मत पेटी भरणार नाही असा सल्ला त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना महाजनाचा संदर्भ देत यावेळी बोलताना दिला.दरम्यान मागील काळात कोविड मुळे व त्याअनुषंगाने लावण्यात आलेल्या निर्बंधांच्या काळात अनेक सण उत्सव नागरिकांना आपापल्या घरात बसून साजरे करावे लागले. पण यापुढे कोविड नसेल तर दिवाळी स्नेहमिलनाचा हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करू असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना दीपावली व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अमरावती दंगलीमागे नवाब मलिकांचाच हात” – हाजी अराफात

News Desk

“एकनाथ खडसेंविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने, ते ईडीला घाबरत नाहीत”, राष्ट्रवादीचं वक्तव्य

News Desk

मोदींच्या आवाहनानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची वेगवेगळी भूमिका

News Desk