HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा जास्त काम केले आहे” – जेपी नड्डा

मुंबई। केंद्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. मात्र या दोघांसोबत ज्येष्ठ नेते जे पी नड्डा यांचे नाव देखील अग्रभागी घ्याव लागेल. आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केलेलं काम आणि त्या कामावरून केलेलं कौतुक हे सातत्याने शहा आणि नड्डा करत असतात. आता देखील तसंच काहीस झाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा अधिक काम केले आहे.”, असे वक्तव्य आता भाजपचे जेष्ठ नेते जेपी नड्डा यांनी आता केले आहे. तसेच, विरोधी पक्षावर टीका करत त्यांनी, त्यांचा लोकशाहीवर नव्हे तर कौटुंबिक राजवटीवर विश्वास असल्याचा घणाघात देखील केला आहे.

आमच्यासाठी राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी ‘वंशवाद’

तर जेपी नड्डा हे चंपा देवी पार्क येथील बुथ अध्यक्षांच्या अधिवेशनाला मार्गदर्शन करत होते आणि त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. नड्डा कोणत्याही पक्षाचे नाव न घेता म्हणाले, “आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवादासोबत आणि ते विरोधक ‘वंशवाद’ वंशवादी राजकारण सोबत पुढे जात आहेत. आमच्यासाठी राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी ‘वंशवाद’ हेच सर्वस्व आहे.पुढे बोलताना जे पी नड्डा असे देखील म्हणाले अर्थातच त्यांच्या बोलण्यातून विरोधकांवर ताशेरे ओढलेले पाहायला मिळाले. अनेक लोक शेतकर्‍यांचे नेते बनतात, पण शेतकर्‍यांसाठी जर कुणी काही केले असेल तर ते मोदी आहेत,” असे नड्डा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिलाय आणि एकीकडे असे देखील म्हटले जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच त्यांचा निर्णय मागे घेतला मोदींना शेतकऱ्यांनी झुकवल आहे. अशा चर्चा सुरू झाल्यात.

आम्ही प्रत्येकाच्या प्रगतीचा विचार करतो

मात्र दुसरीकडे भाजपावर टीका होत असताना नड्डा यांचं हे विधान आता समोर आलं आहे.याचबरोबर, भाजपा ‘सबका साथ, सबका विश्वास’ हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वांना सोबत घेऊन जात असताना, विरोधक मतपेटीचे राजकारण करतात आणि केवळ ‘विशेष समाज आणि कुटुंबाची’ चिंता करतात. अस जेपी नड्डा म्हणाले आहेत. “आम्ही प्रत्येकाच्या प्रगतीचा विचार करतो आणि ते त्यांच्या भावाचा आणि काकाचा विचार करतात. आता त्यांनी काकांबद्दलही विचार करणे सोडून दिले आहे,” असे नड्डा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना म्हटले. म्हणून आता जे पी नड्डा यांच्या याच विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

“पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा ताकदीने फडकेल!” नाना पटोले

News Desk

राज्यातील ८४६ शाळांचा ‘पीएम श्री’ योजनेत सर्वांगीण विकास करणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

Aprna