HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांचे थकलेले पाणी बिल भरणार !

मुंबई | मुख्यमंत्र्यांना आंघोळीला, तोंड धुण्यास उशीर होता कामा नये. नाहीतर निर्णय प्रक्रियेत उशीर होईल. त्यामुळे आपण स्वत: मुख्यमंत्र्यांचे थकलेले पाणी बिल भरणार असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे. ते विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला मुंबई महानगरपालिकेच्या डिफॉल्टर लिस्टमध्ये आला आहे. तब्बल ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाण्याचे बिल थकविल्यामुळे महानगरपालिकेकडून वर्षा बंगल्याचा समावेश डिफॉल्टर यादीत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड बोलत होते.

“मुख्यमंत्र्यांच्या बिलाची रक्कम कितीही असो. ते आम्हा सगळ्यांचे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मी स्वत: चेकने त्यांचे थकलेले बिल भरणार आहे. त्यांचे पाणी अजिबात कापले जाता कामा नये. त्यांना आंघोळीसाठी किंवा तोंड धुण्यास उशीर होता कामा नये. कारण, त्यामुळे महाराष्ट्रासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना उशीर होईल आणि महाराष्ट्राला मोठे नुकसान सहन करावे लागेल”,असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या या डिफॉल्टर लिस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’सह अन्य मंत्र्यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे. या सर्वांची एकूण थकबाकीची रक्कम तब्बल ८ कोटी इतकी आहे. त्यात राज्याच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. सर्वसामान्यांना आणि नेतेमंडळींना असा वेगवेगळा न्याय का ? नेतेमंडळींना एवढी सूट का ? असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर बाळासाहेब ठाकरे वरून राऊतांच्या एक थोबाडीत मारतील!

News Desk

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar

यवतमाळमधील ‘त्या’ कोरोना संशयितांची आज होणार कोरोनाची तपासणी

swarit