HW News Marathi
महाराष्ट्र

“तर.. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना विचारायला हवं”, सुधीर मुनगंटीवाराचं परिवहन मंत्र्यांना उत्तर

मुंबई। राज्यात मागच्या काही दिवसांपासून परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न पेटला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज सुधीर मुनंगटीवार यांच्या काळात एसटीचं विलिनीकरण का केलं नाही, असा सवाल केला होता. आणि लगेचच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. हा प्रश्न मला विचारण्याऐवजी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना विचारायला हवा, त्यावेळी त्यांच्याकडे हे खाते होते, असं मुनंगटीवार म्हणाले आहेत. प्रश्न मार्गी लावायचा असता तर त्यांनी मार्गी लावला असता असा प्रस्ताव त्या वेळी एसटी विभागाच्या माध्यमातून टाकला होता का?, असा सवाल आता मुनगंटीवार यांनी केला आहे.

तुम्ही बारा महिने झोपतात का?

शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीआधी मांडलेल्या जाहिरनाम्यात जे सांगितलं ते इतकं केलं तरी बास होईल. सत्तेचा माज आला असं वागू नका चर्चा करा, एसटी कर्मचारीही आपल्या महाराष्ट्राचे आहेत, असा इशारा मुनंगटीवार यांनी दिला. अनिल परब यांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही केव्हाही चर्चेला तयार आहोत.कुंभकर्ण सहा महिने झोपत होता तुम्ही बारा महिने झोपतात का, असा टोला देखील महा विकास आघाडीतील सत्ताधाऱ्यांना मुनगंटीवार यांनी लगावला आहे.पगारवाढीची मागणी सोडून सर्व मागण्या मान्य केल्यात. उरलेल्या मागण्यांबद्दल चर्चा करायची असेल तर संप मागे घ्यावा लागेल असं अनिल परब म्हणालेत. संप कोर्टानं बेकायदेशी असल्याचं देखील ते म्हणालेत. हायकोर्टात जनतेच्या कराच्या पैशातून वकील करायचा आणि जनतेला कोर्टात टाकायचं हे चुकीच आहे. हायकोर्टाने जरी सांगितलं असलं तरी तुम्ही आज चर्चा करू शकता, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

जनता तुमच्या सरकारला 1000 वर्षासाठी निलंबित करेल

न्यायालयाने बारा आठवड्यात प्रश्न सोडवायला सांगितलेला आहे. म्हणून 12 आठवडे वाट पाहायची असं गरजेच आहे का? तुम्ही कर्मचारी बांधवांना विश्वास द्या त्यांना प्रेमाने सांगा ते कर्मचारी तुमच्यासोबत आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही निलंबित करु अशी धमकी देता. नाहीतर एक वेळ अशी येईल, एक दिवशी ही जनता तुमच्या सरकारला 1000 वर्षासाठी निलंबित करेल, असा घणाघात करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार चांगलेच गरजले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही !

News Desk

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी सात पं.स.मध्ये भाजपची सत्ता  

News Desk