HW News Marathi
Covid-19

स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वेने प्रवासाची केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची परवानगी

मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यावेळी देशातील परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी आणि इतरांची रेल्वेने ने-आण करण्याची परवानगी गृह मंत्रालयाने आज (१ मे) दिली आहे. यासाठी संबंधित राज्यांना एकमेकांशी समन्वय साधावा लागेल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. तेलंगणा राज्यात झारखंडमधील आडकलेल्या १२०० जणांना नेण्यासाठी खूप नॉनस्टॉप ट्रेन सोडण्यात आली.

तेलंगणाप्रमाणे अलूवा, (केरळ) ते भुवनेश्वर, नाशिक ते लखनौ, नाशिक ते भोपाळ, जयपूरहून पटना आणि कोट्याहून हटिया, या १ मे रोजी कामगार दिनानिमित्त सहा ‘श्रमिक स्पेशल गाड्या धावणार आहेत. ठिकाणीहून रेल्वे सोडण्यात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सांगितले. आता या ‘श्रमिक स्पेशल’ गाड्या राज्या-राज्यादरम्यान धावतील. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. राज्यांसोबत चर्चा करून दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजुरांना घरी कसे पोहोचवले जाईल, यासाठी नोडल अधिकारी काम करेल.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या अशा १२०० मजुरांना तेलंगणा लिंगमपल्लीमधून झारखंडमध्ये आणण्यासाठी आज सकाळी भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आली. सामान्य स्थिती एका डब्यात ७२ प्रवासी प्रवास करू शकतात त्या डब्यात आता केवळ ५४ प्रवाशांना बसवण्यात आले आहे. २४ कोचची ही ट्रेन आज रात्री ११ च्या सुमारास झारखंडच्या हटिया येथे पोहोचेल.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लस मोफत म्हणूनच ते पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार ! प्रतिक जयंत पाटलांचा कौतुकास्पद निर्णय

News Desk

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

News Desk

कोरोनाच्या नियमांचं पालन केल्यास कोणत्याही व्हेरिएंटवर करता येईल मात!

News Desk