HW News Marathi
महाराष्ट्र

Bhima Koregaon Case : भाषणांमुळे हिसांचाराची व्याप्ती वाढली !

पुणे | भाजपा आणि आरएसएस ब्राह्मण केंद्रीत अजेंड्याच्या विरोधात दलित समाज गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्या माध्यमातून अटकेतील आरोपींनी केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्णपरिणाम असून, सीपीआयची (एम) पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांनी भीमा कोरेगाव प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

पुण्याच्या शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यातील पाच आरोपींच्या विरोधात गुरुवारी पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपू आणि कॉ. मंगलू अशा दहा जणांविरोधात ५ हजार १६० पानी दोषारोपत्र न्याायालयात दाखल केले. त्यात ८० साक्षीदारांचे जबाब नोंदविल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमचे चेहरे पहिल्यानंतर कोरोना जगात नाही असे वाटते…

News Desk

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

गोरखपूर मंदिर परिसरातील हल्ला प्रकरणी तपास सुरू, UP एटीएसची टीम मुंबईत दाखल

Aprna