HW News Marathi
महाराष्ट्र

Bhima Koregaon Case : भाषणांमुळे हिसांचाराची व्याप्ती वाढली !

पुणे | भाजपा आणि आरएसएस ब्राह्मण केंद्रीत अजेंड्याच्या विरोधात दलित समाज गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्या माध्यमातून अटकेतील आरोपींनी केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्णपरिणाम असून, सीपीआयची (एम) पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांनी भीमा कोरेगाव प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

पुण्याच्या शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यातील पाच आरोपींच्या विरोधात गुरुवारी पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपू आणि कॉ. मंगलू अशा दहा जणांविरोधात ५ हजार १६० पानी दोषारोपत्र न्याायालयात दाखल केले. त्यात ८० साक्षीदारांचे जबाब नोंदविल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली” – बाळासाहेब थोरात

News Desk

फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा शिवसेनेला रामराम!

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण

swarit
क्रीडा

भारतीय महिला संघाचे टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित

News Desk

मुंबई | भारतीय महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत आयर्लंड संघावर ५२ धावांनी मात करुन उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. मिताली राजच्या अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला संघाने हा विजय मिळवला. या आधीच्या दोन लढतींत भारताने न्यूझीलंड आणि पाकिस्तानवर मात केली होती. दरम्यान, भारताचा साखळीतील शेवटचा सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी १० षटकांत ६७ धावांची सलामी दिली. स्मृतीने २९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ३३ धावा केल्या. स्मृतीने मागील दोन लढतींत २६ आणि २ धावा केल्या होत्या. यानंतर इतर फलंदाजांकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, जेमिमा रॉड्रिगेज तीन चौकार मारून माघारी परतली. हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. वेदा कृष्णमूर्तीने पुन्हा एकदा निराशा केली. डी. हेमलताही चार धावांवर धावबाद झाली. मिताली राजने एकाबाजूने किल्ला लढविला. तिने ५६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ५१ धावा केल्या. मितालीचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-२०मधील हे तिचे १७वे अर्धशतक ठरले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या महिलांना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेण्यात अपयश आले. लेविस ९ धावांवर बाद झाल्यानंतर शिलिंग्टन आणि जॉयसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा; पण ही जोडी फुटली आणि आयर्लंडच्या फलंदाजांनी भारतीय महिलांसमोर शरणागती पत्करली. भारताने दिलेल्या १४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला ८ बाद ९३ धावाच करता आल्या. भारताकडून राधा यादवने तीन विकेट घेतल्या.

Related posts

फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालचं अकरावं विजेतेपद

News Desk

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk

आचरेकर सरांनी मला जगायला शिकविले !

News Desk