HW News Marathi
महाराष्ट्र

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि वेळेनुसारच होणार

मुंबई | राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राज्यातील अनेक भागांत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. सोमवारी, ३१ जानेवारी २०२२ रोजी विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी मोर्चा काढला होता. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या शहरांचा समावेश आहे. याशिवाय शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर देखील यावेळी निदर्शने करण्यात आली होती. दोन वर्ष ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आताही परीक्षा ऑनलाईन स्वरूपातच असाव्यात, अशी मागणी विद्यार्थी करत होते. मात्र, शिक्षण मंडळही आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतच परीक्षा देता येणार आहेत.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार असून ऑफलाईन होणार आहे. तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. तसेच दहावीच्या तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत परीक्षा होईल. तर, बारावीच्या प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारीपासून ३ मार्चपर्यंत होणार आहेत. त्याचबरोबर यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी अतिरिक्त १५ मिनिटं मिळणार आहेत. तर, ७० ते १०० गुणांच्या परीक्षांसाठी अर्धा तास अधिक देण्यात येणार आहे. तसेच १०.३० वाजता पेपर सुरु होईल. मात्र, १० मिनिटे आधी म्हणजेच १०.२० ला विद्यार्थ्यांना पेपर देण्यात येईल. तसेच दुपारच्या सत्रात २.५० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येईल, असं शरद गोसावी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामगार नेते श्याम म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन

News Desk

पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?, आशिष शेलारांचा आरोप

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!

News Desk