HW News Marathi
Covid-19

कोटाहून विद्यार्थ्यांना आणण्यास एसटी सज्ज, पण राज्य शासनाकडून आदेश नाही

मुंबई | राजस्थान कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी उद्या (२९ एप्रिल) धुळे जिल्ह्यातून १०० एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले. त्यामुळे, अनेक दिवसांपासून प्रलंबित हा प्रश्न लागल्याबद्दल समाधान व्यक्त होत होते. मात्र, राज्य शासनाकडून अजून याबाबत आदेश आला नसल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे. एसटी महामंडळ यासाठी सज्ज अजून काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप राज्य शासनाकडून तसा कोणताही आदेश आलेला नसल्याची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, यामुळे आता कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यात नेमके कधी आणण्यात येणार हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

काय आहे प्रकरण ?

देशभरातील लाखो विद्यार्थी विविध प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथे जातात. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा त्यात समावेश असतो. दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीर संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फक्त या सर्व विद्यार्थ्यांना बसला. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तो संपेपर्यंत म्हणजे १४ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांनाही तिथेच राहावे असे तेथील शिक्षणसंस्थांनी सांगितले. मात्र, त्यानंतर आता लॉकडाऊन पुन्हा ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने हे सर्व विद्यार्थी तिथेच अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांना आपल्याला राज्यात परत आणण्यासाठीची मागणी होत आहे. त्यामुळे, राज्य सरकारकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अवघे चार दिवस असण्याची शक्यता

News Desk

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत ठरवली !

News Desk

जयंत पाटील पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये, १४ दिवसांच्या क्वॉरंटाईन काळानंतर कामकाजाला केली सुरुवात

News Desk