HW News Marathi
महाराष्ट्र

५०० चौरस मीटरच्या जागेत शाळा सुरू करता येणार, खाजगी शाळांसाठी राज्य सरकारकडून नियमात दुरूस्ती

मुंबई: राज्यात खाजगी शैक्षणिक संस्थाना मोकळे आंदण देण्यासाठी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी नवीन शाळांना परवानगी देण्याच्या नियमात दुरूस्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयानुसार महापालिकेच्या हद्दीत आणि अ दर्जाच्या नगरपालिकांच्या हद्दीत अवघ्या ५०० चौरस मीटरच्या जागेत नवीन शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियम-२०१२ मध्ये दुरूस्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे अर्धा एकर जागा असलेल्या खाजगी क्षेत्रातील कोणत्याही कंपन्या आणि संस्थांना शाळा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परवाने मिळणार आहेत.

यापूर्वी या अधिनियमातील तरतुदीनुसार फक्त धमार्दाय संस्था, सार्वजनिक न्यास किंवा नोंदणीकृत संस्था यांनाच शाळा स्थापन करण्यासाठी अर्ज करता येत होता. तसेच शहरी आणि ग्रामीण भागासाठी किमान १ एकर जागा व मुंबई शहरातील जमिनींचा तुटवडा लक्षात घेता अर्धा एकर जागेची अट घालण्यात आली होती. परंतु या मूळ अधिनियमातच दुरूस्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत महापालिका आणि अ दर्जाच्या नगरपालिकांच्या हद्दीत फक्त अर्धा एकर अर्थात ५०० चौरस मीटर जागा उपलब्ध असणा-या कोणत्याही संस्थेस शाळा सुरु करण्याची परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अपु-या जागेतही शाळांची उभारणी शक्य होणार आहे.

त्याचबरोबर २०१३ साली कंपनी कायदा-२०१३ च्या कलम ८ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या कोणत्याही कंपनीस शाळा सुरु करण्यासही परवानगी देण्यात येणार आहे. या खाजगी कंपन्यांकडून आधीच वेगवेगळ्या संस्थांच्या नावावर खाजगी शाळा सुरु करण्यात येत आहेत. मात्र उर्वरीत नगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदा असलेल्या भागात नवीन शाळा सुरु करण्यासाठी किमान एक एकर जागेची अट कायम ठेवण्यात आली आहे. तसेच या नवीन शाळा सुरु करण्यासाठी व सध्याच्या शाळेची दजार्वाढ करण्यासाठी आॅनलाईन अजार्ची प्रक्रियाही लवकरच सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भ्रष्टाचार करणाऱ्याला तर देवेंद्र फडणवीसांनी जोड्यांनी मारले पाहिजे!

Aprna

“या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये”, दहीहंडी निर्णयावरून अतुल भातखळकर आक्रमक

News Desk

किरीट सोमय्या म्हणतात,’आगे आगे देखो होता है क्या’, देशमुख, परबांनंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर

News Desk
देश / विदेश

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

News Desk

बंगळुरू- प्रचंड पैसा टाकून तसेच देशातील विविध माध्यमांच्या मालकांना हाताशी धरून भाजपने कॉँग्रेसमुक्त भारतचा विडा हाती घेतला आहे. परंतु भाजपच्या या प्रयत्नांना धक्का देणारे वृत्त कर्नाटकमधून हाती येत आहे. येथे आज निवडणुका झाल्यास कॉँग्रेस विजयी होईल, असा अंदाज सी फोर या संस्थेने व्यक्त केला आहे. हा अंदाज देशासाठी नसून केवळ कर्नाटक राज्यासाठी आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना बहुमत मिळणे कठीण जाणार असल्याचे सी फोरने म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सूरू केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचे सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आले आहे. दरम्यान, दक्षिणेत झेंडा रोवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहा यांनी दौरा निश्चित केला होता परंतु हा सर्वे आल्यानंतर त्यांनी तीन वेळा कर्नाटकचा दौरा रद्द केला आहे.

Related posts

केरळच्या विकासासाठी केंद्रसरकार भरीव मदत करणार –  रामदास आठवले

News Desk

राहुल गांधींनी घेतला केरळच्या पूरस्थितीचा आढावा, केंद्राला मदत करण्याचे आवाहन

News Desk

कोमात गेलेल्या लोकांना इच्छामरणाचा हक्क बहाल

News Desk