HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारकडून खोटी आकडेवारी देऊन लोकांच्या डोळ्यात धुळफेक सुरु !

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट गहिरे असताना दुसरीकडे जोरदार राजकारण देखील पेटायला लागले आहे. याचपार्श्वभूमीवर, काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपने “महाराष्ट्र बचाव” आंदोलन केले. त्यानंतर काल म्हणजेच मंगळवारी (२७ मे) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्राकडून राज्याला मदत मिळून राज्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अपयशी ठरत असल्याचा सूर या फडणवीसांच्या त्या पत्रकार परिषदेत उमटला. त्यानंतर त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने आज (२७ मे) पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला आभासी संबोधले. महाविकासाआघाडीची ही पत्रकार संपल्यानंतर फडणवीसांनी देखील तातडीने फेसबुक लाईव्ह करत महाविकासाआघाडीवर पुन्हा एकदा निशाणा साधला. “केंद्र स्रकराकडून मदत मिळूनही राज्य सरकार ते मान्यच करत नाही”, असा आरोपही फडणवीसांनी केला. त्याचप्रमाणे, “राज्य सरकारने प्रत्येक वेळी काहीतरी आभासी आकडेवारी फेकत असते”, असाही टोला फडणवीसांनी लगावला. या फेसबुक लाईव्हमध्ये देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले ? जाणून घेऊया

देवेंद्र फडणवीसांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

  • राज्यात कोरोनास्थिती गंभीर, परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी
  • केंद्राने मदत करुनही राज्य सरकार मान्य करत नाही
  • राज्य सरकार दरवेळी काहीतरी आभासी आकडेवारी फेकत
  • प्रत्येकवेळी केंद्राकडून पैसे येणे बाकी, इतकंचं सांगण्याचं काम राज्य करत आहे.
  • केंद्राने नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत राज्याचे जीएसटीचे पैसे दिले आहेत.
  • खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकार राज्य सरकारकडून सुरु
  • रेल्वे तिकीटांसाठी राज्य ७ ते ९ लाख देते. मात्र, केंद्राला ती रेल्वे चालवण्यासाठी ५० लाख लागतात.
  • टॅक्सचे पैसे खातेदाऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले.
  • 26 मेपर्यंत महाराष्ट्राला 9 लाख 88 लाख पीपीई किट, 16 लाख एन 95 मास्क दिले.
  • या वस्तूंच्या खरेदीसाठी केंद्राने राज्याला 468 कोटी रुपये दिले
  • मुंबईत कोरोना चाचणी कमीच.
  • संपूर्ण देशात ५% पॉझिटिव्ह, तर एकट्या महाराष्ट्रात हे प्रमाण १२% ते १३% पॉझिटिव्ह
  • एकट्या मुंबईत मे महिन्यात हे प्रमाण ३२% पॉझिटिव्ह
  • दिव्यांगांना केंद्रांकडून 122 कोटींचा निधी
  • परप्रांतीय मजुर गेल्याने राज्याचे नुकसान
  • मुंबईत लोकांना बेड्स, वेळेवर उपचार मिळत नसल्याने लोकांचे मृत्यू
  • केवळ खोटी आकडेवारी देऊन लोकांच्या डोळ्यात धुळफेक सुरू
  • आम्ही नेहमीचं राज्य सरकारच्या पाठीशी उभे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात शिरला नवा कोरोना, ब्रिटनमधून परतलेले ६जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

लॉकडाऊन हवा की नको ? लोकांनीच ठरवावं ! – मुंबई महापौर

News Desk

राज्यात काल ८,३४८ नवे रुग्ण वाढले, तर मुंबईत कोरोना रुग्ण संख्या १ लाखांचा पुढे गेली

News Desk