HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारकडून कांद्याला प्रति क्विंटलमागे २०० रुपये अनुदान जाहीर

मुंबई | अनेकदा आपल्या शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन कवडीमोलाच्या भावाने विकावे लागते. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरांमध्ये देखील अशीच मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना प्रति किलो कांद्यामागे अवघे १ ते २ रुपये इतकाच भाव मिळत आहे. दरम्यान राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची दखल घेत कांद्याला प्रति क्विंटलमागे २०० रुपये इतके अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. नाशिकच्या संजय साठे यांनी तब्बल ७५० किलो कांदा विकून कमविलेले एकूण १ हजार ६४ रुपये पंतप्रधान मोदींना पाठविले होते. त्यानंतर पीएमओकडून देखील याची दखल घेतली गेली. कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचा वाढलेला संताप लक्षात घेऊन अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रति क्विंटलमागे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत आपला कांदा बाजारात आणला आहे, त्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. कांद्याच्या प्रति क्विंटलमागे २०० रुपयांच्या अनुदानासह दुसऱ्या राज्यांतील कांद्यांच्या वाहतुकीला देखील प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसते. नाशिकच्या संजय साठे यांनी आपला कांदा विकून आलेले उत्पन्न पंतप्रधान मोदींना पाठविल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पीएमओकडून या प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पिकाला योग्य भाव न मिळणे ही आपल्या देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राऊतांना राणे दोषाची काविळ झाली आहे’, प्रवीण दरेकरांचा टोला!

News Desk

आरोग्य विभागाच्या भरती, खुल्या किंवा ‘ईडब्ल्यूएस’तून एसईबीसीची पदे भरली जाणार

News Desk

कोरोनाबाबत हिंदुस्थानचा इटली, जर्मनी होऊ द्यायचा नसेल!

swarit