HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे !

मुंबई | “धनगड म्हणजे धनगर असल्याचे गाडीभर पुरावे आपल्याकडे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, तेव्हा ते विरोधी पक्षात होते. मग आता सत्तेत आल्यानंतर हे पुरावे कुठे गेले ?”, असा संतप्त सवाल करत गुरुवारी (२७ जून) विधानपरिषदेत धनगर आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे यावेळी राज्य सरकार धनगर समाजाकडे दुर्लक्ष करत असून धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

“प्रत्येक समाज आरक्षण मागत आहे, त्यांना कायदे करुन आरक्षण देखील दिले जात आहे. मात्र, ज्या धनगर समाजाला आधीच कायद्याने आरक्षण देण्यात आले आहे त्यालाच आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. असे करून राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे”, असा आरोप काँग्रेस आमदार रामहरी रुपनवर यांनी केला आहे. “देवेंद्र फडणवीस न बोलवता धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागी झाले, धनगर समाजाचे निर्णय सोडविण्याचे आश्वासन दिले”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात!; जलीलांची राज्य सरकारच्या मराठी पाट्यांवर टीका

Aprna

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला ईडीने बजावली नोटीस

News Desk

अमित शाहांच्या ‘देखते है’चा अर्थ मुख्यमंत्र्यांनी ‘हो’ घेतला –  चंद्रकांत पाटील

News Desk