HW News Marathi
Covid-19

निव्वळ महाराष्ट्राची फजिती करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील !

मुंबई | देशातील ‘लॉकडाऊन ३’च्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना स्वगृही पाठविण्यासाठी केंद्राकडून श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. मात्र, याच श्रमिक ट्रेन्सच्या मुद्द्यावरून आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार आणि केंद्रामध्ये वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला सुनावले आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. “केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्राबाबत व श्रमिक ट्रेनबाबत केलेले वक्तव्य अत्यंत दिशाभूल करणारे आहे. पियुष गोयल यांनी खोटी वक्तव्ये करु नयेत व कोरोनाच्या परिस्थितीत राजकारण करु नये”, असा इशारा राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांचे पत्रही दाखवले.

अनिल देशमुख आपल्या या ट्विटमध्ये म्हणतात कि, “पश्चिम बंगालने २२ मे रोजी केंद्रीय रेल्वेच्या विनोद यादव यांना लिहिले की, २६ मेपर्यंत तेथे श्रमिक विशेष ट्रेन पाठवू नका. कारण राज्य अम्फार चक्रीवादळाचा कहर झेलत आहे. तरीपण रेल्वेकडून जाणून-बुजून महाराष्ट्राला बंगालसाठी ३५ ट्रेन पाठवली. नैसर्गिक आपत्ती आणि महामारी मध्येही माणुसकी पेक्षा राजकारण मोठे का?”, असा सवाल उपस्थित करत अनिल देशमुख केंद्रावर ट्विटरवर निशाणा साधला. “महाराष्ट्राची फजिती करण्याच्या हेतूने या संकटाच्या परिस्थितीत पियुष गोयल यांनी अशा प्रकारचा खोटारडेपणा, असले राजकारण करू नये”, असाही इशारा यावेळी अनिल देशमुख यांनी दिला. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असल्याने गृहमंत्र्यांनी याविषयावर मौन सोडले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या एका संबोधनामध्ये महाराष्ट्रासाठी पुरेशा श्रमिक ट्रेन्सची व्यवस्था करण्यात आली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अत्यंत आक्रमक पवित्र घेतल्याचे पाहायला मिळाले होते. राज्याचा हा दावा फेटाळत रात्री १२.३०, अडीचच्या सुमारास सलग ट्विट्स करत पियुष गोयल यांनी श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. “आमच्याकडे पुरेशा ट्रेन्स उपलबध आहेत, तुम्ही आधी कामगारांची यादी पाठवा”, असे म्हणत ते आक्रमक झाले. त्यानंतर कालच (२६ मे) पीयूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून राज्य सरकार मजुरांची व्यवस्था करण्यात कमी पडत असल्याचा आरोप केला. होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट

News Desk

कोरोना विषाणूविरुद्ध लढ्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने अँटिबॉडी चाचणी किट केले विकसित 

News Desk

दिलासादायक बातमी ! बीड जिल्हा झाला कोरोनामुक्त

News Desk