HW News Marathi
महाराष्ट्र

‘अजूनही चिपळूणकर मदतीच्या प्रतीक्षेत’, उदय सामंत म्हणतात मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार!

मुंबई। राज्य सरकारने पूरग्रस्तांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली. या घोषणेला चार दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही चिपळूणकरांच्या खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम आली नाही. त्यामुळे चिपळूणकरांमध्ये संतापाची भावना आहे. तर, चिपळूणकरांच्या खात्यात उद्या मंगळवारी पाच हजार रुपये जमा होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

पूरग्रस्तांना सरकारकडून हा तात्पुरता दिलासा

चिपळूणमधील बाधितांना तातडीची मदत म्हणून 10 हजारापैकी 5 हजार उद्यापासून खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना सरकारकडून हा तात्पुरता दिलासा दिला जात आहे. सरकार लवकरच सर्व आढावा घेऊन पॅकेजची माहिती घेणार आहे, असं सामंत यांनी सांगितलं.

श्रेयवाद करणाऱ्यांना जनता सोडणार

चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालयाला मंत्री उदय सामंत यांनी 50 लाखांचा निधीही जाहीर केला. चिपळूण आणि रत्नागिरीमधील बाधित ग्रंथालयांनाही तातडीची 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांनी श्रेयवाद करू नये. श्रेयवाद करणाऱ्यांना जनता सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचं विधान केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना भवन फोडू असं बोलून त्यांनी त्यांची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध केली आहे. सेनाभवन हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं मंदिर आहे. मंदिरावर दगड फेकण्याची भाषा करणाऱ्यांना जनता उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरच्या अल्पवयीन मुलीवर रायपूरमध्ये बलात्कार

News Desk

‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसच्या सेवादलाचे नेते कृष्ण कुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aprna

गोपीचंद पडळकर यांचा ‘तो’ प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला – गृहमंत्री

News Desk