HW News Marathi
महाराष्ट्र

अंतिम वर्ष परीक्षांच्या तारखा घोषित! घरात बसून देता येणार परिक्षा…

मुंबई | अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेणार तसंच निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर केला जाईल, असं उदय सामंत म्हणाले आहेत. प्रत्येक कुलगुरूंनी परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबतचा आपला अहवाल समितीसमोर ठेवला, घरात बसूनच परीक्षा घेण्यास राज्यपालही राजी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

१५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावं, असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं. प्रॅक्टिकल परीक्षासुद्धा फिजिकली करायला लागू नये, अशी पद्धत अवलंबणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. परीक्षा मात्र सोप्या पद्धतीने होतील, यावर एकमत आहे. उरलेल्या बाबींवर आज रात्रीपर्यंत निर्णय घेऊ. आज अहवाल फायनल करुन उद्या दुपारपर्यंत परीक्षा पद्धती कशा घ्यायच्या यावर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न असल्याचं उदय सामंत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात २९ वीजचोरांवर कारवाई

News Desk

अखेर ‘हे’ खाते मिळाल्यानंतर विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

News Desk

शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज! – राज्यपाल

News Desk