HW News Marathi
महाराष्ट्र

‘भारतीय संविधानाच्या उद्देशिके’चा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा ! अजित पवार

मुंबई | “विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास करून घेतला पाहिजे”, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय संविधानाची उद्देशिका’ ग्रंथाचे प्रकाशन मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, “आजच्या विद्यार्थ्यांमधून उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेतील उद्देशिकेचा अभ्यास विद्यार्थ्यानी अधिक जागरूकपणे केला पाहिजे, शिक्षकांनी तो करून घेतला पाहिजे. कोरोनाकाळात उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य वाढविण्याबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण लवकरच यशस्वी होऊ !

तसेच सर्व नियमांचं पालन करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण सर्वजण लवकरच यशस्वी होऊ, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘भारतीय संविधानाची उद्देशिका’ या ग्रंथाचे लेखक, संपादक आणि प्रकाशकांचे विशेष कौतुक केले. प्रत्येक घरात हा ग्रंथ नेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. या ग्रंथाचे लेखक प्रा.स्वप्नील सोनवणे, संपादक विठ्ठल मोरे तर प्रकाशक प्रा.संतोष राणे हे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

swarit

दारू पिणाऱ्यांना महिलांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल

News Desk

शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत – जयंत पाटील

News Desk