HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… सुब्रमण्यम स्वामींच्या ‘मातोश्री’ भेटीमागचे कारण

मुंबई | राम मंदिर बांधण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून उशीर करत असल्याचे विधान करत भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी आज (१८ जून) मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना स्वामी यांनी राम मंदिर बांधण्यास सरकार विलंब होत असल्याचे विधान त्यांनी केले आहे.

नुकतेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला आहे. यानंतर स्वामींनी राम मंदिराच्या मुद्यावरून भेट घेतली आहे. राम मंदिर बांधण्यास सरकारला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. जमिनीचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. केंद्र सरकारकडे या जमिनीचा मालकी हक्क आहे. सरकारला वाटेल तेव्हा या जमिनीवर सरकार राम मंदिराचे बांधकाम करु शकते, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

राम मंदिर बांधण्यासाठी केवळ ज्या लोकांचा जमिनी मंदिराच्या बांधकामासाठी वापरणार आहोत. त्यांना त्याबद्दलत योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. तसेच मोबदला दिला असल्याचे कागदपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर कोणत्याही क्षणी सरकार राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करु शकते, असे देखील स्वामी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवणार नाही ,56 संपवायला कितीसा वेळ लागतो ? निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

News Desk

९वी, ११वीच्या विद्यार्थ्यांना Promote करणार?, आज निर्णय होण्याची शक्यता

News Desk

महिला तहसीलदाराचा ‘हिरोईन’ म्हणून उल्लेख, बबनराव लोणीकरांचे बेताल वक्तव्य

swarit