HW News Marathi
महाराष्ट्र

पालकमंत्री जयंत पाटील पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी…

सांगली |सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांची थेट बांधावर जाऊन भेट घेतली.

मागील ४८ तासांपासून सांगली जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. झालेल्या या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला सोबत घेऊन आज खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील, जिल्हाअध्यक्ष अविनाश पाटील, बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील, किसन जानकर, प्रांताधिकारी, तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, आमदारांनी व्यक्त केली नाराजी

News Desk

मी राजीनामा दिला नाही आणि माझ्याकडे मागितलाही नाही – धनंजय मुंडे

News Desk

९०० ई-बसेसमध्ये ३६०० कोटींचा घोटाळा; मिहीर कोटेजा यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

Aprna