HW News Marathi
महाराष्ट्र

‘असे क्षण महत्त्वाचे असतात’, राणे परिवार दिल्लीत दाखल..!

नवी दिल्ली। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून तशी जोरदार चर्चाही रंगू लागली होती. आता त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. राणे यांची पत्नी निलम राणे, चिरंजीव नितेश राणे आणि निलेश राणेही दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राणे यांचं मंत्रिपद फिक्स असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आमदार नितेश राणे यांनी असे क्षण महत्त्वाचे असतात, असे सांगून सूचक संकेत दिल्याने या चर्चांना उधाण आलं आहे.

नारायण राणे कालच(६जुलै) ला दिल्लीत दाखल झाले, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आल्यानंतर ते सिंधुदुर्गातून गोवा आणि पुढे दिल्लीत दाखल झाले. आज (७जुलै) ला सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काल संध्याकाळी दिल्लीतील भाजप नेत्यांच्या गाठीभेटीही त्यांनी घेतल्या. त्यात त्यांचं मंत्रिपद फिक्स झाल्याने राणे यांचे कुटुंबीय दिल्लीत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. आज (७जुलै) ला संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार असल्याने कुटुंबीय सोबत असल्याने राणेंनी कुटुंबाला दिल्लीत बोलावून घेतल्याचं सांगितलं जात आहे.

शपथविधी सोहळ्यापसाठी प्रत्येक नेत्यांच्या केवळ दोनच नातेवाईक किंवा कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राणेंच्या कुटुंबातील तिन्ही सदस्य शपथविधी सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहणार असल्याचं आता समजत आहे.

राणेंचे सुपुत्र काय म्हणाले?

नितेश राणे आज दिल्लीत आलेले असतांना पत्रकारांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली, अनेक प्रश्नांचा भडिमार केला. मात्र नितेश अत्यंत सावध प्रतिक्रिया देत होते. परंतु, बोलता बोलता त्यांनी राणेंना मंत्रिपद मिळण्याचे संकेत दिल्याने राणेंची मोदी मंत्रिमंडळातील वर्णी फिक्स झाली असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री होणार आहेत. असे क्षण आयुष्यात किती महत्त्वाचे असतात, असा सवाल नितेश राणे यांना केला. त्यावर असे क्षण महत्त्वाचे असतात, असं त्यांनी सांगून राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर मात्र, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. थोडा संयम ठेवा. राणेसाहेब पंतप्रधानांकडे आहेत. तेच सर्व काही सांगतील, असं ते म्हणाले.

मिळणारं कोणतंही मंत्रिपद कोणत्याही इतर कारणासाठी वापरलं जात नाही. जनतेसाठी मंत्रिपद वापरलं जातं. राणेंनी त्यांचं मंत्रिपद नेहमीच जनतेसाठी वापरलं आहे, असं सांगतानाच पक्ष वाढवणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडण्यास आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले. राणेंची क्षमता पक्षनेतृत्वाला माहीत आहे. त्यामुळे ते योग्य तोच निर्णय घेतील, असं दिल्लीत दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांनी पत्रकारांजवळ उत्तरले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं…राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप  

News Desk

संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा; नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं!

News Desk

यश जेव्हा यायचं तेव्हा येईल, त्यासाठी तुम्ही धीर सोडू नका… राज ठाकरेंचे भावनिक पत्र!

swarit