HW News Marathi
महाराष्ट्र

‘मदिरालयावर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही’

मुंबई | राज्यात निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाचं संकट अद्यापही तळलेलं नाही . सरकारने अजूनही देवस्थळे सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. यावरून विरोधी पक्षाने आता सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. मंदिराच्या मुद्द्यावरुन आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केल्यानंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मंदिरांबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही

सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारविरुद्ध जोरदार निशाणा साधला आहे. मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही. दारुवाल्यांना सूट देणारं, बार मालकांना सूट देणारं हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे. हे जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, जे बीअर बार आणि दारुमालकांना सूट देतात. मेट्रोचं उद्धाटन चालतं, पुण्यातील कार्यालयाचं उद्घाटन चालतं, डान्सबार सुरु केले तरी यांना चालतं, त्यामुळे कोरोना होत नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा केली तर कोरोना येतो असं राज्यातील थोर नेत्यांना वाटत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही

मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. तो ज्यावेळी 700 मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजनची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे. आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही. तरी आपण सर्व गोष्टींची तयारी ठेवत आहोत. त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोव्हिडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचं भयावह वातावरण न वाटता चांगलं वातावरण तयार करण्यासाठी हे सेंटर उभारले आहेत, असं ते म्हणाले आहेत.

गर्दी योग्य नाही

लहान मुलांचे कोव्हिड सेंटरचं उदघाटन करताना त्यांनी लोकांना तिसऱ्या लाटेची आशंका वर्तवली आहे. ही गर्दी योग्य नाही. आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. कोणत्याही राजकीय स्वार्थ किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असं वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक, सामाजिक संघटनाना मी विनंती करतो की, आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असं काही करू नका, असं कळकळीचं आवाहन करतानाच कोरोना संकट अजूनही टळलेलं नाही. आपल्याला हे टाळायचा आहे. आपण जर नियम पाळले नाहींतर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोणीही कितीही चिथावणी दिली, भडकवलं तरी त्यांच्या चिथावणीला दाद देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवैधरित्या सागवान तस्करी करणारा टेंम्पो भोकर वनविभागाने पकडला

News Desk

“प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नाही तर पेशवाईला फटका”

News Desk

इमारत कोसळून ८ ठार, ३५ ढिगा-याखाली

News Desk