HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जबाजारी शेत-यांने केली आत्महत्या

औरंगाबाद बाभुळगाव खुर्द येथे एका शेत-यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली आहे. भानुदास फकीरा तुपे (४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

भानुदास तुपे यांचे प्रेत सकाळी त्यांच्याच शेतात झाडाला लटकलेले आढळून आले. यानंतर स्थानिकांनी याबाबत शिवुर पोलिसांना माहिती देण्यात आली. तुपे यांच्या नावावर 3 एकर शेती होती. काही वर्षापुर्वी त्यांनी महाराष्ट्र बैंक व एका खाजगी फायन्स कंपनी कडून कर्ज घेतले होते. तुपे यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी शिवुर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंची अनुपस्थिती!

News Desk

काँग्रेसचा आज हाथरस घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह!

News Desk

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची गिरीष महाजन यांनी केली चौकशी

Aprna
क्राइम

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

हिंगोली – सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अमोल नामदेव पतंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.

कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला.

आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related posts

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, भाजपासहित सर्वांची…”, उदयनराजे

News Desk

अभिनेता आदित्य पंचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

भोकरमध्ये ६७ हजाराची अवैध देशी दारु  जप्त

News Desk