HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्रात दिवाळीनंतर भाजपचं सरकार येईल”, सुजय विखे पाटलांचं विधान

ठाणे | भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा भाजपच्या अनेक नेत्यांकडून केला जातो. यामध्ये आणखी एका खासदाराची भर पडली आहे. भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी दिवाळीनंतर राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार

सुजय विखेपाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी कर्जत तालुक्यात आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर राज्य सरकारच्या योजनांसंबधीच्या तक्रारी आल्या. तो धागा पकडून विखे पाटील म्हणाले, ‘थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात विखे यांनी हे विधान केल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिवाळीनंतर आपल्या विचारांचे सरकार राज्यात सत्तेवर येणार

कर्जत पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीमध्ये नागरिकांनी अनेक प्रश्न आणि समस्या सुटत नसल्याबद्दल तक्रारी केल्या. त्यांना उत्तर देताना विखे म्हणाले, ‘दिवाळीनंतर आपल्या विचारांचे सरकार राज्यात सत्तेवर येणार आहे. यामुळे तुमचा कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. थोडे दिवस थांबा.’ असं डॉ. विखे पाटील म्हणाले आहेत.

राज्य सरकारची मदत केवळ कागदावरच राहिली

केंद्र सरकारच्या योजना सांगताना सुजय विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं, तर राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ७२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणाऱ्यांना ५० हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली. परंतु ती केवळ कागदावरच राहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष, विद्यार्थी आणि युवक यांच्यासाठी विविध योजना देशांमध्ये राबवल्या आहेत. संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये नागरिकांसाठी करोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. जेथे लसीकरण कमी झालं आहे, तेथे विशेष मोहीम राबवली जाणार असून १५ सप्टेंबरपर्यंत सर्व गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सारखं झालेलं असेल,’ असं सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला सुशांतच्या परिवाराने पाठवलेल्या नोटीसची कल्पना नाही, जर वाटलं काही चूक झाली असेल तर माफी मागेन – संजय राऊत

News Desk

“राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला”, अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

इगोपोटी राज्य सरकारने मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला -फडणवीस

News Desk