HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठांना ‘आधार’सक्ती

कोल्हापूर |ज्येष्ठ नागरिकांना एस.टीचा प्रवास अर्ध किंमतीत असतो त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र आवश्यक आहे. मात्र आता ज्येष्ठांना सवलतीसाठी अचानक आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. सवलतीसाठी आधारकार्डशिवाय कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. असा नियम एस. टी. महामंडळाने काढला आहे. या नवीन नियमांमुळे ज्या वाहकांनी जुन्याच ओळखपत्राद्वारे तिकीट दिले. त्यांना एस. टी. महामंडळाने या वाहकांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

बुधवारी आधारकार्ड नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण तिकीट काढा किंवा खाली उतरा, असे म्हणत चक्क एस.टी.तून उतरवण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे वाहक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवले. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत नाही असा नियम सर्व वाहकांनी लागू केला आहे. पूर्वकल्पना न देता एस. टी. महामंडळाने मंगळवारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली त्यामुळे पूर्वकल्पना द्यावी असे वृत्तपत्र विक्रेता संघटना, राज्य उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी पालिका निवडणूक लढणार!

News Desk

राज्याच्या विकासाला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प ! – नाना पटोले

Aprna

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

Aprna
क्राइम

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

News Desk

अहमदनगर | अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी पहाटे ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे (वय ७०), रमेश भाऊसाहेब कातोरे (५१), बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय ५०), दगडू आनंदा भांगे (वय ५०) आणि हनुमान अंबादास दुसे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

सत्यम रमेश कातोरे (वय १६) हा जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्वजण खरवंडी, नेवासा तालुक्यातील रहिवासी असून आषाढी वारीनिमित्ताने पंढरपुला गेले होते. पंढरपुरातील दर्शन झाल्यानंतर सर्वजण घराच्या दिशेने येत असताना अहमदनगर-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

Related posts

बलात्कार आरोपातून पतीची सुटका करण्यासाठी धडपडणाऱ्या विवाहितेकडे वकिलाची सेक्सची मागणी

News Desk

गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणावर चाकू हल्ला, तरूणाचा मृत्यू

News Desk

कोल्हापूरात मिरवणूक अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीचे उपचार दरम्यान मृत्यू

News Desk