HW News Marathi
महाराष्ट्र

लखीमपूर खेरीप्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली | लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणीतील मुख्य आरोपी अजय मिश्रा टेनी यांचा पुत्र आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. आणि न्यायालयाने आशिष मिश्राला पुढील सात दिवसात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आज (१८ एप्रिल) सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची जामीन अर्ज फेटाळला आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाची सुनावणी पार पडली. 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये १० फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आशिष मिश्रा यांचा जामीन मंजूर करण्याताला होता. यानंतर  पीडिता कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घतेली होती. यानंतर आज  या प्रकरणाच्या याचिकेवर दोन्ही बाजुचा युक्ती न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने आज लखीमपूर आशिष मिश्रांनी ९  शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

 उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात शांततापूर्ण आंदोलन करत होते. तेव्हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मागून येऊन त्यांच्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेत ४ शेतकरी आणि ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मिश्रा आणि त्यांच्या मुलाविरोधात संताप व्यक्त केला गेला होता. यानंतर आशिष मिश्रासह १४ अटक करण्यात आली असून सध्या ते जेलमध्ये आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकीय रंग बदलणे पडळकरांचा गुणधर्म | प्राजक्त तनपुरे

News Desk

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या दिल्लीतील राजकीय हलचालींना वेग

News Desk

बचत गटांना संधी देण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर विक्री मॉल उभारणार; सुनील केदार यांची घोषणा

News Desk