HW News Marathi
देश / विदेश

UGCच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विरोधात युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज होणार सुनावणी

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेणे हेच उचित असल्याचे म्हटले जात होते. मात्र, युजीसीने परीक्षा घेतल्या पाहिजे यावर आपले ठाम मत दिले होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नका, अशी विनंत केली होती. मात्र, या विनंतीला दाद न दिल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युजीसीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज (२७ जुलै) सुनावणी होणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर, विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण केले जाणार असेही जाहीर केले होते. मात्र, युजीसी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम राहील्याने संभ्रम झाला होता. आणि त्यामुळेच युवासेनेसह देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील पोलीसांना शौर्य पदक जाहीर

swarit

UK च्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड

Aprna

ऑगस्ता वेस्टलँड घोटाळा : ख्रिस्तियन मिशेल भारताच्या ताब्यात

News Desk