HW News Marathi
महाराष्ट्र

बेटी बचाओ, बेटी पढाओ, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या उलट कारभार उत्तरप्रदेशात सुरु

मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका १९ वर्षीच तरुणीवर बलात्कार झाल्याची गंभीर घटना घडली. तिच्या हत्येवरून संपूर्ण देशातून उत्तरप्रदेश सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलीस आणि प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आता या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढावो अभियानाच्या अगदी विरोधात कारभार सुरू आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

“बेटी बचाओ, बेटी पढाओ, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे? असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच या अमानुष घटना थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची व ते राबविण्याची गरज आहे”, असे मतही त्यांनी मांडले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही; आमदार साटम यांची बोचरी टीका

Aprna

“कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार”

News Desk

भाजप-शिवसेनामधील संघर्ष सोडविण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर

News Desk