HW News Marathi
Covid-19

#SushantSinghRajput Case | बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली CBI चौकशीची शिफारस

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळेच वळण मिळत असल्याचे चित्र आहे. या प्रकारच्या तपासावरून देशातील राजकारण पेटताना दिसत आहे. विशेषतः मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार असा मोठा वाद निर्माण झालेला पाहायला मिळतो. या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु असताना बिहार पोलिसांकडून वारंवार हस्तक्षेप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, सुरुवातीपासून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारचा विरोध राहिला आहे.

सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केल्याचा आरोप बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी (२ ऑगस्ट) केला. मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या पथकाचे विनय तिवारी नेतृत्व करत आहेत. अभिनेत्री रिया चक्रबर्ती हिनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याच्या मृत्यूबाबत २५ जुलैला पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर, बिहार पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे.

“मुंबई पोलीस पाटणा पोलिसांना तपासात कोणतेही सहकार्य करीत नाहीत. उलट चौकशीत अडथळा निर्माण करत आहेत”, असा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाची योग्य चौकशी करत असून ते सत्य शोधण्यास सक्षम आहेत. तरीही राजकीय फायद्यासाठी याचा तपास सीबीआयला द्यावा अशी मागणी होत असून त्याचा मी तीव्र निषेध करतो”, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण केली, योगी आदित्यनाथांचा आरोप

News Desk

आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार, लॉकडाऊनबद्दल काय निर्णय होणार?

News Desk

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे !

News Desk