HW News Marathi
महाराष्ट्र

रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा तुपकरांनी सरकारला दिला आहे. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीनंतर तुपकरांनी स्थगित केल्याची माहिती मिळाली आहे. तुपकरांच्या मागण्याबाबात बुधवारी (२४ नोव्हेंबर) राज्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तुपकरांनी कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज (२० नोव्हेंबर) चौथा दिवस होता. तुपकरांनी अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती काल (१९ नोव्हेंबर) खालावली होती. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तुपकरांच्या आंदोलनाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आंदोलन आणखी चिघळलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये अतिरिक्त ऊसाचा पहिला बळी; संतप्त शेतकऱ्याने ऊस पेटवून ऊसाच्या शेतामध्ये केली आत्महत्या

Aprna

पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या बातम्या केवळ अफवा, भाजपमध्ये होत्या, आहेत आणि राहतील !

News Desk

“राज्यातील रक्त पुरवठा वाढविण्यासाठी मी स्वतः रक्तदान करणार”,सुप्रिया सुळेंचा निर्णय

News Desk