HW News Marathi
महाराष्ट्र

स्वाभिमाच्या कार्यकर्त्यांचे मंत्रालयासमोर दूध आंदोलन

मुंबई | स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रालयासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. रिजनल काॅम्प्रहेन्सिव इकाॅनाॅमिक पार्टनरशिप (आरसेप) करार त्वरीत रद्द, या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी मंत्रालयासोमर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केले आहे. या प्रकरणी आंदोलनानंतर राजू शेट्टी आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे.

तसेच सरकार विरोधात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या आहेत. सो ळा देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार आहे. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी या वेळी केली आहे.

या करारामुळे दुधावरील आयत शुल्क कमी करावे लागणार असून चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहेत. यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये अशी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

Aprna

#COVID19 : ३३ नव्या रुग्णांची भर, राज्यात कोरोना बाधितांची संख्या ७८१ वर

News Desk

“हिम्मत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या!” – नाना पटोले

News Desk