HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्येही तब्लिगीचा कार्यक्रम होणार होता, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अनर्थ टळला

औरंगाबाद | दिल्लीत निजामुद्दीन येथे झालेला तब्लिगी समाजाच्या कार्यक्रमाने कोरोनाच्या संख्येत वाढ झाली. दिल्लीतील हा कार्यक्रम १४-१५ मार्चला वसईत होणार होता. मात्र महाराष्ट्र पोलीसांच्या तत्परतेने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. असाच कार्यक्रम औरंगाबादमध्ये २७-२९ मार्च दरम्यान होणार होता. पण औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी या सोहळ्याला परवानगी नाकारल्याने मोठा अनर्थ टळला.

औरंगाबादच्या चितेगाव येथे हा सोहळा होणार होता. ३ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी तयारीही करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही लॉकडाऊन जाहीर केला आणि त्यातच राज्यसरकारने कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आणि हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. इतकेच नव्हे तर लग्न सोहळ्यातही गर्दी न करण्याचे आवाहन सरकारने केले होते. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी तातडीने तब्लिगीच्या चितेगावमधील या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने भविष्यातील मोठा अनर्थ टळला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेझॉन आणि फ्लिपकार्टने मराठी भाषेचा पर्याय आणा अन्यथा मनसे स्टाईलने सण साजरा होईल!

News Desk

“…तर तुमचं कर्तृत्व काय”, संजय राऊत यांचा पडळकरांवर हल्लाबोल!

News Desk

महाराष्ट्रात कोरोनाचा सातवा बळी,  कोरोनाग्रस्त ४० वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू

swarit