HW News Marathi
महाराष्ट्र

तौक्ते वादळाच्या परिस्थितीत अजित पवार मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात ठाण मांडून 

मुंबई | तौक्ते वादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले तीन दिवस प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून आढावा घेत आहेत. शिवाय या वादळाने कोणतीही जिवितहानी होऊ नये यासाठी सर्वपध्दतीने सरकारच्यावतीने तयारी करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सगळी माहिती घेत आहेत. कोकणातील काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर मुंबईतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीकेसीतील कोविड सेंटर जे तात्पुरते उभारण्यात आले होते. त्यातील १९३ रुग्णांना मनपाच्या विविध हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जे रुग्ण आयसीयूमध्ये होते त्यांनाही व्यवस्थित हलविण्यात आले आहे. जिवितहानी होणार नाही यादृष्टीने ही दक्षता घेण्यात आली आहे. अजून धोका टळलेला नाही लोकांनी सतर्क राहावे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी दुर केलेल्या संभ्रमाचा रोहीत पवारांनी केले ट्विट

swarit

‘पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु’

News Desk

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून होणार; ‘या’ तारखेला सादर होणार अर्थसंकल्प

Aprna