HW News Marathi
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये भीषण अपघात, १० जण जागीच ठार

यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात ट्रक आणि तवेरा गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण जागीच ठार झाले असून हा अपघात पहाटे ५ वाजच्यादरम्यान झाला. या अपघातात मृत झालेले सर्व जण दिल्ली आणि पंजाब येथील रहिवासी होते.

हे शीख कुटुंब दर्शनासाठी नांदेडला आले होते. हे कुटुंब तीन गाड्यातून प्रवास करत असून त्यातील एका गाडीला कोसदनी घाटात अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून यवतमाळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर, २० एप्रिलपासून कापूस विक्री होणार सुरु

News Desk

भाजपचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आघाडीमध्ये दुफळीचे चित्र दाखवत आहे – रोहित पवार

News Desk

PandharpurElection : पंढरपुरात पहिल्या फेरीत भाजपला ४५० मतांची आघाडी तर राष्ट्रवादीची पिछाडी

News Desk