HW News Marathi
Covid-19

राज्यासंबंधित या मुद्द्यावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र ?

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासन-प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, ठाकरे सरकारकडून राज्यात ‘विकेंड लॉकडाऊन’सह काही कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, हे लावण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या संभाषणानंतर राज ठाकरेंकडून मनसैनिकांना सरकारच्या नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज (५ एप्रिल) पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाच्यास्थितीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकत्र आले.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज संध्याकाळी ६ वाजता झूम मीटिंगच्या माध्यमातून व्हीसीमार्फत संवाद झाल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी राज्य सरकारने रविवारी (४ एप्रिल) जाहीर केलेल्या कठोर निर्बंधांना राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राज ठाकरेंशी संवाद साधला आहे. त्यामुळे, कोरोनाच्या या स्थितीत ठाकरे बंधू पुन्हा एकत्र पाहायला मिळाले अशी चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी यावेळी राज्य सरकारने केलेल्या निर्बंधामध्ये काही सुधारणा सुचवल्या आहेत. दरम्यान, राज्यात कडक निर्बंध लावण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही फोनवर संवाद साधला होता. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यात कडक निर्बंध लावले जातील याबद्दल सहकार्य असू द्या, अशी विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी थेट पत्रक काढून सरकारी नियम पाळण्याचे आवाहन केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगावात २०० कोरोना सैनिक सज्ज

News Desk

Covishield Vaccine चा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

News Desk

‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’च्या जाहीरातबाजीवर खर्च केले तसे आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये !

News Desk