HW News Marathi
Covid-19

फडणवीसांनी ब्राम्हणांसाठी केलेल्या घोषणांच्या ठाकरे सरकारने बोऱ्या वाजवला ! चंद्रकात पाटलांची टिका

मुंबई | सध्याची कोरोनाची स्थिती समाजातील प्रत्येक घटकासाठीच आव्हानात्मक आहे. आरोग्यासह एक मोठे आव्हान सध्या अनेकांसमोर आहे ते म्हणजे आर्थिक संकटाचे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र्र भाजपकडून ब्राह्मण पुरोहित आणि कीर्तनकारांना “एक हात मदतीचा” या उपक्रमाच्या माध्यमातून साहाय्य केले जात आहे. “ब्राह्मण समाजातील एक वर्ग हा मोठ्या प्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले आहे”, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “आरक्षण नसणाऱ्या, विशेषतः ब्राह्मण समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ‘अमृत’ महामंडळाची योजना आखली होती. पण गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या सगळ्या महामंडळाचा बोऱ्या वाजला आहे. अमृत महामंडळासाठी आम्ही विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र लिहिले होते. पण कदाचित कोविडमध्ये व्यस्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी आम्हाला उत्तर दिले नसावे”, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ब्राह्मण समाजातील पौरोहित्य आणि किर्तनकारांना झळ !

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, “ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने अमृत महामंडळ स्थापन करुन त्याला १ हजार कोटी रुपये देऊन ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. त्यानुसार या महामंडळाची स्थापनाही झाली. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. केवळ मंत्रिमंडळ मान्यता बाकी होती. ती मान्यता मिळणार तितक्यात राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर विश्वासघातामुळे भाजपा सरकार गेले, अन् महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसेच, विद्यमान ठाकरे सरकारने हा अमृत महामंडळाचा विषय मंत्रिमंडळात आणून कार्यान्वित करावी अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “कोरोनाचा समाजाच्या सर्वच घटकांना फटका बसला. ब्राह्मण समाजातील पौरोहित्य आणि किर्तनकारांना याची झळ बसली. या वर्गाला ही संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून निधी उभारुन ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना एक आधार देता येईल”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे उद्यापासून अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ वेळ सुरू राहणार

News Desk

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांना प्रत्येकी १० लाख !

News Desk

कोरोनाचे IPLवर सावट, BCCI ची आयपीएलचे उर्वरित सामने रद्द करण्याची घोषणा

News Desk