HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल – नारायण राणे

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये असताना युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं. त्यानंतर आज, शनिवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांसह ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी आज किंवा उद्या कधीना कधी सरकार पडेल, असा घाणाघात नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर केला.

नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात त्यांना विचारले असता नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, संजय राऊत यांनी हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेलच असे वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी एकदा तरी २५ वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.

राज्याने त्यांचे कर कमी करावेत

तसेच चंद्रकांत पाटील मंत्री बनण्यासाठी शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असेही राणे नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी नारायण राणे यांना इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विचारलं असता राज्याने त्यांचे कर कमी करावेत. जेणेकरुन त्यांचे दर कमी येतील, असे राणे म्हणाले. हे सरकार कुठल्याही क्षणी पडेल. त्यासाठी एक महिना, दोन महिने असा वेळ मी देणार नसल्याचे राणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर

swarit

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

News Desk

Shame on ‘The Quint’! अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहिता पेक्षा मोठे कधीच असू शकत नाही.

News Desk