HW News Marathi
देश / विदेश

अदानी कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवले

मुंबई | मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे.

मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीके कडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर गरबा डान्स

मुंबई विमानतळाचा ताबा हा अदानी कंपनीकडे जाणार याची चर्चा सुरु असतानाच केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका झाली होती. त्यानंतर १३ जुलैला रोजी या विमानतळाचा ताबा अदानींना मिळाला. त्यानंतर अवध्या आठवड्याभरातच विमानतळाचं मुख्यालय हे अहमदाबादला हलवण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावर सोमवारी दांडियाच्या गाण्यावर करण्यात आलेल्या फ्लॅशमॉबवरही टीका झाली होती.

https://twitter.com/hvgoenka/status/1416444239546753026?s=20

‘… ‘गरबा’ कराल तर आम्हालाही ‘झिंगाट’ दाखवावा लागेल’, मनसेचा अदानीला इशारा

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा आता अदानी उद्योग समुहाकडे देण्यात आला आहे. या घडामोडीनंतर अदानी उद्योगसमुहाने कंपनीचं मुख्यालय मुंबईवरुन गुजरातला हलवलं आहे. परंतू यानंतर राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरुन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अदानी समुहाला थेट इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अदानी उद्योग समुहाचे कर्मचारी गरबा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर मुंबईतले उद्योग गुजरातला नेण्याचा हा डाव असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेनेही या वादात उडी घेऊन, फक्त व्यवस्थापन अदानीकडे गेलंय. विमानतळ मुंबईतच आहे. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल असं ट्वीट नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांदनी ‘निखळली’ | अभिनेत्री श्रीदेवीचे निधन

Adil

लाडक्या अभिनेत्यासाठी बनविली चक्क ५७ किलोची इडली!

News Desk

बोट उलटल्याने ११ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

News Desk