HW News Marathi
Covid-19

कोरोनाविरुद्धची लढाई ही आपण घरात बसूनच जिंकायची आहे!

मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाविरुद्धची लढाई ही आपण घरात बसूनच जिंकायची आहे. यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन संघ स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी यांनी केले आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ता ऑनलाईन आज (२६ एप्रिल) बौद्धिकातून आपली भूमिका मांडली

आणखी काही काळ सर्वांनीच सकारात्मकपणे सहकार्य करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भडकविणाऱ्या लोकांच्या बोलण्यात न फसता भय व क्रोध दूर ठेवून एकत्रितपणे कार्य करावे. समाजात सद्भाव व शांतीचे वातवारण बनवावे, असे भागवत म्हणाले. संघ स्वयंसेवक व समाजातील दात्यांनी कुठलाही भेदभाव न बाळगता प्रत्येक गरजूला मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

देशातील कोरोना बाधितांची संख्या २६ हजार ४९६ पर्यंत पोहोचली आहे. तर या २४ तासात देशभरात कोरोनामुळे ४९ जणांचा मृत्यू आला आहे. तर याच काळात ७४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात ५ हजार ८०४कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा २४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले!

News Desk

धूळ’फेक’ न करता केंद्र व राज्य सरकारने मिळून अधिकाधिक कंपन्यांना प्रयत्न करावा !

News Desk

#Coronavirus : देशात गेल्या २४ तासात ३६०४ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk